ज्ञानरचनावाद

👧🏻मा.श्री.नंदकुमार साहेब यांचे आज शनि. 5/3/2016 च्या "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र चर्चासत्र  परिषदेमधील ठळक मुद्दे -👦🏻

👉🏻शैक्षणिक व्हाट्स ऍप ग्रुप तयार करा.शैक्षणिक चर्चा करा.
👉🏻शिक्षणाची चर्चा करून धुंदीत राहा,ते शरीरासाठी हानिकारक नाही.
👉🏻मा श्री माळी, मा श्रीम ज्योती परिहार, मा श्रीम ललिता भामरे मा श्रीम भराडे मॅडम यांच्या कार्याचा सोदाहरण उल्लेख केला.
👉🏻ज्याला कोणाला वाटते 100 टक्के मुले शिकत नाहीत त्यांनी आधी स्वतःची मानसिकता बदला.
👉🏻इतरांचे चांगले बघणे ही खूप चांगली सवय आहे ते बघायला शिका.
कधीही बघितल्या शिवाय विश्वास बसत नाही.
👉🏻कुमठे बीट च्या शिक्षकांनी 10 ते 15 वर्ष मेहनत केली ,ते लोक करू शकतात तर आपण का करू शकत नाहीत.तेथील 40 शाळांमधून मुले शिकत आहेत.
👉🏻भामरागड,गडचिरोली,नाशिक, चंद्रपूर या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी बदल घडविला.तर आपण का घडवू शकत नाही.
👉🏻मराठी भाषेत 6 लाख शब्द आहेत कोणीही शब्द तयार केले नाहीत परंतु ते आपण वापरूनच शिकत असतो.
👉🏻इतरांनी चांगले जे केले तेच वापरून पुढे जायचे आहे.
👉🏻शाळेतील प्रत्येक मूल प्रगत झालेच पाहिजे.
👉🏻ज्ञानरचनावादी पद्धतीचा वापर करा.
👉🏻प्रगत शाळा ,केंद्र,बीट यांना ऑन ड्युटी भेट द्या...विदयार्थी प्रगतीचा ध्यास घ्या.
👉🏻अधिकारी व शिक्षक यातील दरी कमी करून मैत्रीपूर्ण व दडपणविरहित काम करून उद्दिष्ट गाठा.
👉🏻शाळेतील प्रत्येक मूल शिकू शकते हा विश्वास प्रत्येक शिक्षकास/  अधिकाऱ्यास हवा . 
👉🏻ज्ञानरचनावादी अध्ययन हा विद्यार्थी प्रगत करण्याचा राजमार्ग आहे. त्याचा अवलंब करा.  
👉🏻3 ते 4 महिन्यात 100% शाळा, केंद्र  ,बीट व तालुका  प्रगत  करणे शक्य आहे. उदा. विमान व ट्रेन आपण तयार केली नाही. ती तयार करण्यास अनेक वर्षे लागली  व आता त्यांचा वापर करून आपण कोठे ही प्रवास करतो. 
👉🏻 प्रगत झालेले बीट कुमठे, मिरज, निफाड, ताडाळी व वहाळ  (चिपळूण )पहा. प्रत्यक्ष अनुभव घेतला तर विश्वास निर्माण होतो.
👉🏻प्रधान  सचिव ते शाळेतील शिक्षक एका समान पातळीवर येवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडण्यासाठी प्रयत्न करूया.
👉🏻 प्रत्येक  मुलासाठी प्रयत्न करा.मुलांना बोलते करा.मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा.
👉🏻सांगली, उस्मानाबाद याठिकाणी घेतलेल्या शिक्षण परिषदेने शिक्षक व सर्व अधिकारी यांच्यात एक धुंदी दिसली. ज्ञानरचनावादी व विद्यार्थी प्रगत करण्याची धुंदी .अशी धुंदी सर्व शिक्षक व अधिकारी यांनी जोपासली  तर महाराष्ट्र लवकरच 100% प्रगत होईल. 
👉🏻शिक्षकांनी आळस जोपासा.वेगवेळया कल्पना वापरून प्रगतीचे स्वप्न सत्यात उतरवा.
👉🏻 एका वेळी एकच काम करणार अशा भ्रमात राहू नका. एका वेळी नियोजन करून अनेक कामे           ( Multitasking ) ची सवय जोपासा.
👉🏻पाठ टाचण..नियोजने गौण.,up - down करा कुठेही रहा .पण मुले प्रगत बनवा,
👉🏻 शाळेतील वातावरण आनंददायी व प्रसंन्न ठेवा.
 👉🏻 मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा.
👉🏻मुलांचे चेहरे फुलांसारखे टवटवीत दिसले पाहिजेत.
👉🏻प्रत्येक मूल बोललं पाहिजे.
👉🏻कुठूनही ये जा करा पण 100℅ मुले प्रगत करा.
👉🏻टाचन, मासिक तथा वार्षिक नियोजन याची अजिबात सक्ती नाही.
👉🏻 कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. तणाव विरहित वातावरण शाळेत निर्माण करा.
👉🏻 प्रत्येक मूल आपलंच आहे आणि ते शिकणार आहे या भावनेने काम करा.

अशाप्रकारे आज उत्साही आणि आनंददायी वातावरणात लोनावळा येथील शिक्षण परिषद आज पार पडली.. सर्वच जण तेथून नवा उत्साह घेऊन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र साकार करण्याच्या उद्देशाने बाहेर पडले.
👧🏻"मिळाली नवी वाट,
निश्चितच उगवेल प्रगत महाराष्ट्राची पहाट"
 धन्यवाद......! 
👦🏻🌺🌅🌺👧🏻🌅🌺
*********************************
=============================















**********************************
==============================
कुमटे बीट आणि भराडे मॅडम 
**********-***********************
*** 👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
सातारा जिल्हातील सज्जनगडाच्या पायथ्याशी काही गावं वसली आहेत. डोंगर -दर्‍यांच्या कुशीत वसलेल्या या गावांत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यांतील अडतीस शाळांत शिक्षकांच्या मदतीनं ‘रचनावाद’ राबवायचा असं मी दोन वर्षांपूर्वी ठरवलं. ‘मूल स्वत:च्या ज्ञानाची निर्मिती स्वत: करतं’ हे पुस्तकात वाचायला सुंदर होतं. पण शिक्षकानं किंवा गुरूनं शिकविल्याशिवाय कोणी शिकू शकत नाही हा मनावरचा संस्कार पुस्तकातलं हे वाक्य स्वीकारायला नव्हता. प्रत्यक्ष प्रयोग बघितल्याशिवाय त्या प्रयोगावर माझा विश्‍वास बसत नाही. सातार्‍याजवळच वाईमध्ये ‘भारत विद्यालय’ ही अरुण किर्लोस्कर यांची खाजगी शाळा रचनावाद राबवते असं कळल्यानंतर मी त्यांच्या परवानगीनं एका वर्गात तीन दिवस पूर्णवेळ ठाण मांडून बसले. स्वत: शिकणारी, न घाबरता बोलणारी, मुलांच्या दृष्टीनं सतत खेळणारी तर माझ्या दृष्टीनं सतत अभ्यास करणारी मुलं मला आव्हान देऊन गेली. शिक्षणक्षेत्रात काम करायचं असेल तर ‘मेंदू शिकतो कसा?’ हे कळलं पाहिजे हे याच शाळेत मला पहिल्यांदा समजलं.
रचनावाद व मेंदूशिक्षण याबाबत दोन व्याख्यानं कुमठे बीटमधील १३८ शिक्षकांसाठी आयोजित केली. निम्मा वर्ग दोन तासात बर्‍यापैकी झोपला. एवढा गहन विषय त्यांना पेलेना. तरुण शिक्षक (मनानं) समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. पण एकूणच अवघड दिसत होतं. ‘प्रयत्न तर करूया’ एक मन म्हणत होतं, तर दुसरं मन ‘आपण मुलांच्या आयुष्याशी तर खेळत नाही ना?’ अशा द्विधा अवस्थेत होतं. शेवटी शिक्षकांशी चर्चा करून, पहिलीचा नवीन वर्ग १४ जूनऐवजी १ मार्चलाच भरवायचा ठरवला. १ मार्च ते १ मे हे दोन महिने प्रयोग करू. प्रयोग अयशस्वी झाला तर जूनपासून ‘वर्तनवादी’ पद्धतीनं शिकवू असं ठरलं.
मुलं शाळेत न येण्याची कारणं माहीत होतीच. शाळा व वर्ग यातलं वातावरण निरस असलं की मुलं, शिक्षक, समाज सगळेच शाळेपासून पळून जातात. त्यासाठी प्रथम शाळा सुंदर करायच्या ठरल्या.
पहिली मोहीम शाळेला पांढरा शुभ्र रंग देणं, शाळा परिसरात खेळणी उभी करणं आणि गुरं न खातील अशी जास्तीजास्त झाडं लावणं. कामाला झटून सुरुवात झाली. रंग झाला, खेळणी उभी केली. दोन शाळांतली खेळणी दुसर्‍या दिवशी चोरीला गेली. वृक्षलागवडीचंही तसंच. जकातवाडी शाळेत झाडं लावली की नेहमीच कोणीतरी उपटायचं. यावर्षी रानटी झाडं लावली आहेत. आज शाळा हिरवीगार दिसते आहे.
शाळेत बिनखर्चात खेळता येतील असे खेळ घ्यायचं ठरलं. वर्गात बांधून बसावं लागतं म्हणूनही मुलं शाळा सोडत असतात. त्यासाठी त्यांना हवं तेव्हा खेळायला द्यायचं. मुलं शिकत राहतील अशा खेळांची यादी तयार केली. सागरगोटे, गोट्या, काचाकवड्या, सूरपाट्या, कांदाफोड, आबाधुबी यांसारखे पन्नास खेळ, हस्तनेत्र समन्वय, शरीराचा समतोल साधता येणं, एकाग्रता वाढणं, बैठक वाढणं या गोष्टी मुलांना खेळातून साध्य करता आल्या. खेळातून ‘मेंदू-विकास’ही करता आला. निर्णय घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी खेळाची खूपच मदत झाली.
हे दोन महिने खेळ, परिसरअभ्यास, वर्गसजावट, रांगोळी काढणं, चित्र काढणं यांमध्ये गेले. मूल शिकतं कसं हे समजण्यास हे दोन महिने उपयोगी पडले. हा बदल शिक्षकांच्या दृष्टिकोनात होता. मुलांना मारायचं नाही, त्यांना लागेल असं बोलायचं नाही, त्यांच्यात चांगला बदल कसा घडतो हे बघत त्यांना प्रोत्साहन द्यायचं असं ठरवणं वेगळं आणि प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणं वेगळं. अंमलबजावणी करताना किती तारांबळ होते ते अनुभवलंं, कळलं. ‘हुशार’, ‘ढ’ हे शब्द अजूनही मनातून निघालेले नाहीत. पहिलं एक वर्ष तर ‘असं बोलायचं नाही’ असं एकमेकांना सांगण्यात गेलं. संयम हा गुण शिक्षकात असल्याशिवाय ‘रचनावाद’ राबवता येत नाही हे नक्की. मूल प्रत्येक गोष्ट स्वत: शिकेपर्यंत वाट बघणं ही खूपच त्रासाची गोष्ट होती. पण हळूहळू आम्हाला कळतंय की, ‘शिकताना चुकणं ही शिकण्याची पायरी आहे’.
रचनावादाची तयारी करताना एकेका मुददयासाठी कोणकोणतं साहित्य तयार करावं लागेल याची यादी तयार केली. साहित्य तयार करण्यासाठी कच्चा माल एकत्र खरेदी केला. एकत्र बसून साहित्य तयार केलं. प्रत्यक्ष वापर करताना वेगळाच अनुभव आला. मुलांना स्वत:हून वाचता यावं यासाठी खूप कष्ट व खर्च करून पाच हजार ‘शब्दचित्र-कार्ड’ तयार केली. प्रत्यक्षात दीडशे ते दोनशे शब्द मुलांना व्यवस्थित वाचता आले की मुलं गोष्टीची पुस्तकं वाचू लागतात हा शोध नंतर लागला! ज्या शिक्षकांना ‘मूल स्वत:हून शिकतं’ हे समजलं तिथले वर्ग वेग घेऊ लागले. ऑगस्टपर्यंत पेन्सील-पाटी हातात दिली नाही तरीही मुलं गणन करू लागली. खडे, चिंचोके मणी यांच्या मदतीनं त्यांना व्यावहारिक गणितं पटपट येत होती. एखाद्या मुलाचं चुकलंच तर दुसरी मुलं मदत करत होती. शिक्षकांनी मुलांचं पूर्वज्ञान विचारात घेतलं, त्याचा फायदा मुलांइतकाच शिक्षकांनासुद्धा झाला. मुलांना माहिती होते पण शिक्षकांना माहिती नव्हते असे कितीतरी शब्द मुलं वर्गात सांगत होती. गोष्टीत लिहीत होती. मुलं धाडसी होत चालली होती. काहींना तो मुलांचा उर्मटपणा वाटत होता. माझ्या दृष्टीनं ती एकप्रकारे गुलामगिरीतून सुटका होती.
रचनावाद राबवताना मला व माझ्या शिक्षकांना आमूलाग्र बदलावं लागलं. आज माझ्या बीटमध्ये ‘मुलं स्वत: शिकत आहेत.
                                  
    -प्रतिभा भराडे मँडम
       [विस्तार अधिकारी, कुमठे बीट, सातारा]
🌺👦🏻🌅👧🏻🌅🌺
**********************************

*********************************
*     रचनावाद    * 
=============================
👦🏻ज्ञानरचनावाद👧🏻
रचनावादी अध्ययन व अध्यापनासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमटे बीट पँटर्न गाजताेय सन २०१५ १६ प्रयाेगीक तत्वावर काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवीला जाणार आहे माझी शाळा त्यासाठी निवडली असुन त्याबाबत नुकतेच सातारा येथे प्रशिक्षण झाले त्यामध्ये प्रत्येक विषय कसा शिकवावा व मुलांना शिक्षकांनी  शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे कुमठे बीटामध्ये गेली तीन वर्ष ही अध्यापन पध्दती राबवली असुन ३९ शाळामध्ये १ही विद्यार्थी अप्रगत नाही …

ज्ञानरचनावाद म्हणजे काय ???

१)भराडेमॅडम= यांनी pptच्या सहाय्याने मेंदु शिकण्याचा अवयव आहे.शरीराच्या २% वजन असणार्‍या मेंदुस २०% प्राणवायु लागतो.मेंदु वाढ गर्भात ७०%,पहिल्या वर्षी १५%,तीन वर्षात १०%,बारा वर्षात ५%होते.जन्मतः१००अब्ज मज्जापेशी मेंदुत असतात.शिकणे नैसर्गिक आहे.सुखद अनुभवांनी मज्जापेशींना फुटवे फुटतात तर दुःखद अनुभवांनी मज्जापेशी नष्ट होतात.मुलास तु चांगला आहेस गोड आहेस असे प्रबलन देत रहाणे मेंदुविकासास महत्वाचे आहे.आपण वर्तनवादी पध्दतीचे गुलाम आहोत.गणित सोडवण्याच्या पध्दती सांगु नये मुलांनी शोधायला हवे.मुलांस भीती वाटते तेव्हा न्युरोकार्टिक्सकडुन भावनिककडे प्राणवायु पुरवठा होतो खंडित पुरवठा सतत होणारी मुले उपद्रवी बनतात.मुलांस आनंददायी वातावरणात शिक्षण चांगले होते.

इंग्रजी भाषा
instruction 400अर्थासह संग्रहित केल्या.रोज १०सुचना देणे.Genral question 150 संकलित केले परिपाठावेळी 5प्रश्न विचारणे.तसेच Myselfप्रमाणेMy friend My School  My Teacher घेणे.स्वयंअध्ययनकार्ड flashcard रोज 5 घेणे.dictionary मधुन शब्द शोधण्याचा खेळ घेणे.नेटवरुन भरपुर rhymes घेणे.word puzzelsवone word     one sentence   one question  अ
👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
*********************************
=============================
.👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺 
कुमठे बीट उपक्रम

प्रयोगशील अधिकारी प्रतिभा भराडे, बीट- कुमठा, सातारा. यांचे अनुभव -
1) मेंदू शिकण्याचा अवयव आहे. हा शिकतो कसा? निसर्गाने मानवाला जन्मताच ज्या शक्ती दिल्या आहेत त्याचाही विचार व्हायला हवा.
2) आम्ही काम करताना पहील्यादा स्वतःला बदलवले. ती अवघड प्रक्रिया आहे. आपल्या कन्सेप्ट क्लीअर व्हायला हव्यात.
3) प्रथम शाळा मुलांसाठी तयार केल्या. शाळा परीसर देखना केला. यासाठी वेळ कमी लागतो.
3) शिकणे नैसर्गिक आहे. मेंदूला जेथे आव्हान आहे तेथे शिकण्याची गती जास्त आहे.
4) मुलांना खेळायला आवडते. त्यात आव्हान असावे. पारंपारिक खेळात मज्जापेशीची जोडणी होते. मुलांची निर्णय घेण्याची ताकद वाढते. यासाठी शाळा खेळण्यासाठी परिपूर्ण करायला हव्यात.
5) पताका, तक्ते शिक्षकांशी बोलून काढून टाकले. त्याचा मुलासाठी उपयोग होत नाही हे अनुभवाअंती सिद्ध आहे.
6) वर्गाला आतून दरवर्षी पांढरा रंगा देतो. स्वच्छ  सुंदर वर्ग  दिसण्यासाठी याची मदत होते
6) शिक्षणाची दोन उद्दिष्ट साध्य करायची हे मी ठरवले आहे 1 समस्या निवारणाची ताकद निर्माण करणे. 2 स्वतःचे ज्ञान स्वतः मिळवण्याची ताकद देणे.
7) आम्ही शाळा वर्ग  स्वच्छ केले. रेडीमेड शैक्षणिक साहीत्य वर्गातून बाहेर काढले. शिक्षकांचा जिव अडकलेला असतो त्यात. मोकळा वर्ग मुलांना शिकण्याला व अभिव्यक्तीसाठी आवश्यक असतो. यासाठी मुला

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
*********************************
=============================
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺.
ज्ञानरचनावाद तत्वे


ज्ञानरचनावादी शिक्षणाची तत्त्वे 
🎋)शिक्षणे ही एक क्रियाशिल प्रक्रिया आहे.
🎋)शिकणे ही अनुभवाधारित प्रक्रिया आहे.
🎋)शिकणे  ही एक मानस प्रक्रिया आहे.
🎋)लोक शिकता-शिकताच शिकायला  शिकतात.
🎋)शिकणे हे संदभाॅधीन असते.
🎋)शिकणे  ही जेवढी व्यक्तिगत तेवढीच सामाजिक कृती.
🎋)शिक्षणात भाषेचे स्थान मध्यवतीॅ असते.
🎋)ज्ञानाने ज्ञान वाढत जाते.
🎋)नवनवी आव्हाने शिकण्याला उद्युक्त करतात.
🎋)शिकण्यासाठी पुरेसा किलावधी आवश्यक असतो.
🎋)शिकण्यासाठी इतरांचे साहाय्य  होऊ शकते.
🎋)शिकण्यासाठी भावनिक स्थिरतेची गरज असते.

👥👤👥ज्ञानरचनावादी शिक्षकाची वैशिष्ट्ये 👥👥👤
1)व्यक्तिभेदाचा आदर
2)बहुविध बुध्दिमत्तेचा आदर
3)सकारात्मक प्रबलन
4)मानसिक आधार
5)परीक्षा पद्धती

ज्ञानरचनावाद प्रक्रीया
➖➖➖➖➖➖➖

१. मुले आपल्या ज्ञानाची रचना स्वत: करतात. या रचनेसाठी त्यांना विविध समृद्ध अनुभव मिळणे गरजेचे  आहे.

२.        ‘हाताने करून शिकणे’ हा ज्ञानरचनावादातील महत्त्वाचा भाग आहे.

३.        मुलांच्या चुकांकडे त्यांच्या शिकण्यातली महत्त्वाची पायरी म्हणून पाहायला हवे. ज्ञानरचनावादात मुलांच्या व्यक्तिगत विचाराला आदराचे स्थान आहे.

४.        मुलांच्या ज्ञानरचनेत मोठ्यांच्या सहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलाला शिकण्याच्या विशिष्ट टप्प्यावर काय आणि कशी मदत करावी याचे भान शिकवणार्‍या

-👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
***********************--*-******
============================
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺

ज्ञानरचनावाद गृहितके
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१)विद्यार्थी स्वत:चे स्वत कृती करून शिकतील.
२)स्वतच्या प्रेरणेने व आवडीनुसार कृती करतील.
३)अनेक प्रकारचे अनुभव विद्यार्थांना मिळतील.
४)विद्यार्थी सतत काहीतरी करत करत शिकतील.
५)विद्यार्थी एकमेकांची मदत घेतील.
६)विद्यार्थी एकमेकांना सहकार्य करतील.
७)मुल स्वतच्या गतीन शिकतील.
८)मुलांना अध्ययनाच्या अनेक संधी मिळतील.
९)विद्यार्थांना निवडीचे स्वातंञ्य मिळेल.
१०)शिक्षणातील एकसारखेपणादूर होईल.
११)विद्यार्थांच्या कृतीला प्रोत्साहन मिळेल.
१२)शिक्षणातील आंतरक्रीया प्रभावी होईल.
१३)सहअध्ययनामुळे विद्यार्थातील सामाजिकता वाढेल.
१४)आपणहून शिकणे या शिकण्याच्या नैसर्गिक प्रवृतीला चालना मिळेल.
१५)स्वातंञ्य, स्वयंस्फुर्ती,कल्पकता, निर्मितीक्षमता या गुणांना पोषक वातावरण मिळेल.
१६)मुक्त अभिव्यक्तीची संधी मिळेल.
१७)विद्यार्थी प्रकटीकरणाचे स्वातंञ्य अनुभवेल.
१८)समस्या सोडविण्यासाठी आवश्यक गुण विद्यार्थात येतील.
१९)शिक्षणातील छोटी छोटी आव्हाने पेलण्याचे स्वातंञ्य मुलांत विकसित होईल.
२०)विद्यार्थी ज्ञानाची निर्मिती करू शकेल. म्हणजेच ज्ञानाचा रचियता असेल.
२१)विद्यार्थांत शोध घेण्याची वृती वाढेल.
२२)तणावमुक्त वातावरणात विद्यार्थी शिकेल.
२३)जिज्ञासा ,उत्सुकता वाढीस लागेल.
२४)स्वंय अध्ययनाची सवय ला

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
***-*****************************
============================
👦🏻🌅🌺👧🏻🌅🌺
ज्ञानरचनावाद या प्रक्रियेतील अडचणी
ज्ञानरचनावाद ही संकल्पना अतिशय सुंदर आहे. ज्ञानरचनावाद प्रत्येक शाळेत पाहिजेच. ज्ञानरचनावाद राबवायला हवाच यात वाद नाही. पण तो राबवत असताना त्यात ब-याच अंशी  भडका उडला आहे

सध्याच्या ज्ञानरचनावाद या प्रक्रियेतील अडचणी 

१) ज्ञानरचनावाद राबवण्यासाठी खूप घाई केली जात आहे. या आधी विद्यार्थ्यांना आम्हीच हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवायला शिकवले. (कारण ज्ञानरचनावाद हा शिक्षकाने आधी राबवला असता तर त्याला विद्यार्थ्यामधील बेशिस्तपणा म्हटले असते.) आता त्यांना ती काढायला आम्हीच सांगतो. ते लगेच कसे शक्य आहे.

२) प्रत्येक अधिका-यांना माझे केंद्र/बीट/तालुका कधी एकदा प्रगत होतोए कधी ज्ञानरचनावाद राबवला जातोय असे झाले आहे. त्यासाठी आम्हा शिक्षकांचाच वेळ वाया जातोय. ज्ञानरचनावादाची प्रशिक्षणे –सतत मुख्याध्यापकाच्या सभा वाढतच चालल्या आहेत.

३) ज्ञानरचनावादासाठी लागणा-या साहित्याचा भुर्दंड शिक्षकांना/ मुख्याध्यापकांनाच सोसावा लागतोय. त्यासाठी स्वतंत्र निधी नाहीच.

४) ज्ञानरचनावादाच्या नावाखाली अनेक अधिकारी स्वतःची मते / विचार लादताना दिसतात. उदा. हेच साहित्य हवे, तेच साहित्य हवे. काही जणांना शाळा रंगवलेल्या, काही जणांना फरशा रंगवलेल्या तर काही जणांना नकोत अस वाटत.

५) जरी मा. नंदकुमार साहेबांचे म्हणणे शिक्षकांवर दडपण / 

👧🏻🌅🌺👦🏻🌅🌺
********************************
============================ 

No comments:

Post a Comment