मराठवाडा विशेष

औरंगाबाद 
*--********************************
👦🏻बीबी का मकबरा👧🏻
🔘बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी, हिची कबर आहे.
🔵बांधकाम🔵
ही कबर असलेला मकबरा औरंगजेबाच्याच काळात मलिकाच्या मुलाने-आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये बांधला. हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster) असे म्हणतात. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला असून, त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी या मिनारांवर जाता येत होते.
⚪राष्ट्रीय संरक्षित स्मारक
ही राबिया दुर्रानीची कबर २८ नोव्हेंबर, इ.स. १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली.[१]
**********************************
🌺 नांदेड जिल्हा🌺
स्थान
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा 
क्षेत्रफळ
१०,५२८ चौ. कि. मी. 
🌺लोकसंख्या 🌺
३३,५६,५६६ (२०११ नुसार) 
अनुसूचित जाती :४,९८,१९६ 
अनुसूचित जमाती
 २,५३,५९६ 
जिल्हाधिकारी : श्री सुरेश काकाणी
🌺 प्राकृतिक रचना 🌺
१) जिल्ह्याचा  उत्तर व ईशान्य भाग सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला आहे. 
२) जिल्ह्याच्या दक्षिण – नैऋत्य सीमेवर बालघाटाचे डोंगर आहेत. 
३) नांदेड जिल्ह्याच्या मध्य भागातून गोदावरी नदी वाहते. हा प्रदेश सपाट व सुपीक आहे.
🌺 नद्या 🌺
४) नांदेड जिल्ह्याची गोदावरी नदी ही प्रमुख नदी आहे. गोदावरी नदी परभणी जिल्ह्यातून वाहत येऊन पुढे आंध्र प्रदेशात प्रवेश करते. 
५) आसना, सीता, सरस्वती, मांजरा ह्या नद्या नंतर गोदावरी नदीला मिळतात. मांजरा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहते. 
६) बहुतांश सर्व नद्या पूर्वेकडून वाहतात.
🌺 तालुके 🌺
७) एकूण १६ तालुके [ अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड तालुका, नायगाव आणि उमरी. 
८) मुदखेड, हिमायत नगर, माहूर, धर्माबाद व उमरी हे नवीन तालुके २६ जून १९९९ रोजी अस्तित्वात आले 
९) ३० डिसेंबर १९९९ रोजी अर्धापूर, नायगाव – खैरगाव हे नवीन तालुके अस्तित्वात आले. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील तालुक्याची संख्या १६ झाली आहे. 
🌺शेजारील जिल्हे 🌺
१०) यवतमाळ, आदिलाबाद व निझामाबाद (आंध्र प्रदेश), बिदर (कर्नाटक), लातूर, परभणी आणि हिंगोली.
🌺शेती 🌺
११) मुख्य पिक ज्वारी, त्या खालोखाल कापूस चे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. किनवट तालुक्यात बाजरी चे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याशिवाय गहू, केळी, उस, यांचे पण उत्पादन घेतले जाते.
🌺 धरणे 🌺
१२) केदारनाथ, मनाठा (कयाधू नदीवर), वरवंट (मन्याड नदीवर) 
🌺 प्रमुख स्थळे 🌺
१३) प्रसिध्द गुरुद्वारा – गुरु गोविंदसिंग यांची समाधी, नृसिंह मंदिर, प्राचीन मंदिरे – होट्टल, जनावरांचा बाजार – माळेगाव, उनकेश्वर – गरम पाण्याचे झरे, किनवट – अभयारन्ये, माहूर – प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. 
🌺 आदिम जाती – जमाती 🌺
१४) किनवट – कंधार तालुक्यात लमाण ही जमात मोठ्या प्रमाणात आढळते. या जमातीचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. तसेच ‘कोलाम’ किंवा ‘कोळंब’ ही अतिमागास जमात सुद्धा आढळते. 
🌺 हवामान 🌺
१५) उष्ण व कोरडे. उन्हाळा कडक, जिल्ह्याच्या पश्चिम भागात ८० ते १०० सेमी पाऊस पडतो. 
१६) पूर्वेकडील व ईशान्येकडील डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण वाढते. या भागात १०० ते १२० सेमी पाऊस पडतो.
**************************************
वेरूळचे कैलास मंदीर,...जगातील "एकमेव" मंदीर आहे..आधी कळस.. मग पाया
जे संपूर्ण दगडात कळसापासून पायापर्यंत कोरून बनवलेले आहे
कैलास हे एकमेव मंदिर असे नाही की जे कळसापासून पाया पर्यंत कोरले गेले. भारतात असे अनेक प्रयत्न झाले. याचे वैशिष्ट्य असे की त्या मालिकेतले हे सर्वात मोठे मंदिर आहे आणि ते पूर्णत्वालाही गेले. अजिंठा येथील लेणी ज्या चित्रकला व शिल्पकला यांमुळे जगप्रसिद्ध आहेत
वेरूळ येथील लेणीदेखील प्रसिद्ध असून, त्यास मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली ती येथील ‘आधी कळस मग पाया’ ही नवी म्हण निर्माण करणार्या ‘कैलास मंदिरामुळे’. औरंगाबादपासून वायव्येस सुमारे २१ कि.मी. अंतरावर बालाघाटाच्या डोंगरात वेरूळच्या लेणी वसलेल्या आहेत. पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या कैलास लेण्यांचा जिर्णोद्धार करून तेथील पूजाअर्चेसाठी वर्षासन बांधून दिले
१६ व्या क्रमांकाचे लेणे हे ‘कैलास लेणे’ या नावाने जगप्रसिद्ध आहे. कारण याच कैलास मंदिरामुळे ‘आधी कळस, मग पाया’ ही नवी म्हण निर्माण झाली आहे असे म्हणता येईल. कारण, कोणतीही वास्तू उभी करतांना त्या वास्तूचा पाया आधी तयार होतो व मग त्यावर सर्वांत शेवटी कळस चढवला जातो. पण हे कैलास मंदिर मात्र त्या तत्त्वाला अपवाद ठरले आहे. हे संपूर्ण मंदिर एकाच-एकसंघ अशा-दगडात कोरलेले आहे. या मंदिराभोवती दगडांची नैसर्गिक भिंत आहे.
कैलास पर्वत उचलणार्या रावणाची बरीच शिल्पे या वेरूळच्या लेण्यांमध्ये आढळतात. पण या सर्वात कैलास मंदिरातील शिल्प उत्कृष्ट आहे. याशिवाय गंगा, यमुना, सारीपाट खेळणारे शिव-पार्वती, कार्तिकस्वामी, गणेश, नटराज यांचीही शिल्पे येथे पाहण्यास मिळतात. या हिंदू लेणींमध्ये शैव-वैष्णव असा भेदभाव फारसा दिसत नाही. जवळ जवळ दीडशे वर्ष (१० पिढ्या) इथे काम सुरु होते तरीही यात एकही चूक कोणत्याही कलाकाराच्या हातून झालेली आढळत नाही. त्यामुळे जगातले पहिल्या क्रमांकाचे हे आश्चर्य म्हटले गेले पाहिजे.
****************************************
तुळजापूर 
तुळजापूरची तुळजाभवानी
 उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून २६०० फुट इंच असून येथील भवानी मातेचे मंदीर बालाघाट डोंगरच्या कडेपठारावर वसले आहे. या डोंगराचे पूराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते.कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.
संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात -श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.
एवढेच नव्हे तर मातेचे भक्त हिन्दुस्तनतच नव्हे तर परदेशातही आहेत. हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.
उस्मानाबाद - तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे.व सोलापूर येथून ४५कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव ,मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.
कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले.परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सतिजाण्याचा निर्णय घेतला; परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडुन ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली. आणी तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला.त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली.
दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला.
यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणी खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली.
तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला.
तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले.ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे-तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले.निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाब्तीत हस्तक्षेप करीत नसत.1920 पर्यंत या गावात एकही धर्मशाळा नव्हती.या साली गावची लोकसंख्या सूमारे 5000 एव्हडी होती.  भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पाय-या उतरल्यानंतर महाद्वार लागते.
त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते.
पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली.
तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तिर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. यास्तव या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो.त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे.
पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते.
त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे.
येथे सिद्धीविनायक आहे.नंतर निंबाळकर दरवाजा लागतो.
दरवाजा ओलांडून आत गेलेअसता मातेचा कळस नजरेस पडतो.
हाकळस पंचधातूपासून बनविला आहे.मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे.
मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे.इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिरराष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते.गाभा-याचे मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूध झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देविने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहेत. तर दूस-या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशुल खुपसला आहे.तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजुला सिंह आणि पूराण सांगणारी मांर्केडेय ऋषीची मुर्ती दिसते. देविच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सुर्य कोरलेला दिसतो.
देविला स्पर्श कोणालाही करता येत नाही.देवीला पूर्वी 3 वेळा पूजा केली जात. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते. गाभा-याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे.तसेच दक्षिण दिशेला देविचे न्हाणीघर आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देविची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते.(असे इतरत्र आढ्ळत नाही)सभामंडप ओलांडून गेल्यावर पुर्वेला भवानी शंकराची वरदमुर्ती ,शंकराचे स्वयंभू पिंड ,पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो.
मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह, खंडोबा ,चिंतामणी या देवतांच्या मुर्ति दृष्टीस पडतात.
येथील काही प्रेक्षणीय स्थळे:-
१)काळभैरव:-- हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे.भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे.
२)आदिमाया व आदिशक्ति:-- देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ही देवता आहे.
३)घाटशीळ:-- डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आंत देविच्या पादूका आहेत.
घाट्शीळवर उभारून देविने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला.तेव्हा रामाने देविला ओळखले व तो म्हणाला’तु का आई’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत.जवळच मंदीर संस्थानने बांधलेली बाग आहे.
४)पापनाश तीर्थ:-- हे एक तीर्थ असून पापनाशिनी असे याचे प्राचीन नाव आहे.येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते.
अशी लोकांची धारणाआहे.
देऊळ जुने पण मजबूत आहे.
५)रामवरदायणी -येथे रामवरदायनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते.
तेव्हा सितेला शोधण्यासाठी रामचंद्रयेथे आले असते या देविने त्यांना वर दिला व योग्य मार्गदाखवीला.याच्या मागच्या बाजूस चंद्रकुंड व सूर्यकुंड नावाची पाण्याची ठिकाणे आहेत.
६)भारतीबूवाचा मठ:-- देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो.याचे मुळ पूरूष रणछोड भारती यांच्यासोबत श्रीदेवी सरिपाट खेळत असे. मठ जुना,मजबूत व प्रेक्षणीय आहे.
७)गरीबनाथाचा मठ:--हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.
८)नारायणगिरीचा मठ:-- हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत.
सध्या हा येथिल क्रांती चौकात आहे.
९)मंकावती तीर्थ:--मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे.असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते.
याला विष्णू कुंड असेहि म्ह्णतात.यावर महादेवाची पिन्ड आहे.तसेच मोठे मारुति मंदीर आहे.त्याचबरोबर याज्ञवाल्यक्य महाराजांचा आश्रम येथे आहे
१०)धाकटे तुळजापूर:--येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे.
या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव करते.महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे.
भोसले घराण्याची ही कुलदेवता असून रामदास स्वामी हे देखील उपासक होते.
महाराष्ट्रातील हिंदूंच्या श्रद्धेनुसार तुळजापुरातील भवानीचे क्षेत्र देवीच्या शक्तीपीठापैकी एक आद्यपीठ आहे.
उस्मानाबादजिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूर पासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे.देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदीजवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची धाटणीहेमाडपंतीआहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे.
स्वराज्य संस्थापना करणारे शिवाजीराजे भोसले यांच्या भोसले घराण्याचीही कुलदेवताहोय. यादेवीच्या आशीर्वादाने शिवाजी राजांना राज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली,अशी समजूत भाविकांमध्ये प्रचलित आहे. आख्यायिके नुसार देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती.रामदास स्वामीहे देखील उपासक होते.
***********************"************"

No comments:

Post a Comment